Monday, February 25, 2013

पाकिस्तानचा कट व आपले धोरण

मुंबईला ताज हॉटेल मध्ये व आता हैदराबादला नुकत्याच झालेल्या २१ फेब्रुवारीला झालेल्या बॉम्ब स्फोटात १६ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले. बातम्यांवरून असे कळते की हा स्फोट घडवून आणण्यात इंडियन मुजाहदीनचा हात आहे. बातम्यांवरून व मिळालेल्या पुराव्या वरून इंडियन मुजाहदीन हा लष्करे तायबाचीच भारतातली संघटना आहे असे कळते. नाव इंडियन मुजाहदीन पण काम लष्कर ए तायबाचे. आता हे सर्वश्रुतच आहे की लष्कर ए तायबा हे पाकिस्तानच्या आय एस आय चा एक भाग आहे. ह्याचाच अर्थ हा होतो की, काही कारण नसताना, पाकिस्तान ने आपल्या देशाची सीमा उल्लंघून हैदराबादला स्फोट घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने आपल्या देशावर चढाई केली आहे. आता पाकिस्तानने काय केले हे जाणण्यासाठी आपल्याला सुरक्षा परिषद भरवण्याची काही गरज नाही. कोठल्याही शब्दकोशात "देशाची सीमा उल्लंघून चढाई करणे" ह्याचा एकच अर्थ होतो व तो म्हणजे आक्रमणहा होय. पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केले आहे. पाकिस्तानने एका सुनियोजित दीर्घकालीन कटाने आपल्या देशावर हल्ला चालवला आहे, त्याचा, काश्मीर व अजून सुद्धा घेता येईल तेवढा भूभाग घ्यायचा इरादा आहे. हे दर्शवणारा अर्थ शब्दकोशात बघितला तर ह्यालाच युद्ध छेडणे असे म्हणतात. मग जे एखादा शब्दकोश सुद्धा सांगू शकतो त्या पाकिस्तानची मानसिकता समजण्यासाठी आपण कोणाची वाट पाहत आहोत? कोणी दुसरा देश आपल्या कानात कानगोष्टी करायला येणार नाही की पाकिस्तान आपल्या देशाचा शत्रू आहे व तो शत्रुत्वाच्या धर्माचे स्वातंत्र्य मिळाल्या पासून पालन करत आला आहे. तो आपल्या विरुद्ध युद्ध पवित्र्यात नव्हे नव्हे युद्ध पुकारले आहे. हैदराबादचा स्फोट म्हणजे आपल्यावर पाकिस्तानने केलेले आक्रमण आहे.


हे आपल्याला जितक्या लवकर समजेल त्यातच आपले भले आहे. आपण हे जाणून, ताबडतोब उभय देशांमधले सगळ्या तऱ्हेचे सांस्कृतिक, व्यापार व खेळांचे संबंध थांबवले पाहिजेत. उभय देशा मधले सगळे दळणवळण थांबवले पाहिजे. पाकिस्तानातला आपला उच्चआयोग परत घेतला पाहिजे व दिल्लीतल्या पाकिस्तान उच्च आयोगाला हाकलले पाहिजे. सगळ्यात आधी "आमन की आशा" हे उभय देशातला आपसातला सौहार्द्रभाव वाढवण्याचे जे नाटक चालले आहे ते थांबवले पाहिजे. ह्याच बरोबर पाकिस्तानला इशारा दिला पाहिजे व तो धुडकावून जर त्याने आपले पूर्वीचेच खेळ परत चालू ठेवले म्हणजे परत अशी घटना भारतात कोठेही घडली व जर असे सिद्ध झाले की त्या मागे पाकिस्तानचा हात आहे, तर भारताने लागलीच त्या देशावर प्रत्याक्रमण करून त्या देशाला धडा शिकवायला पाहिजे. हे करायची तयारी नसेल तर तात्काळ आपसातले विश्वास वाढवणारे सगळे उपाय थांबवले पाहिजेत. आपण विश्वास वाढवणारे उपाय करायचे व त्याने रोज येथे बॉम्ब स्फोट घडवून आणायचे हे एकाच वेळेला होऊ शकत नाही. उलट आपल्या असल्या वागण्याने आपल्या देशाचा शत्रुत्वाचा मानस बोथट होतो. आपले धोरण गुळमुळीत राहते. व आपली मानसिकता मुळामुळीत होते. पाकिस्तान आपला शत्रू आहे व शत्रूशी जसे वागले जाते तसेच त्याच्याशी वागले पाहिजे.

आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा
आणि येथे
(मराठी ब्लॉग)


No comments:

Post a Comment